सर्व कर्मचारी बंधू भगिनींना कळविण्यात येते की, दि 27 मार्च 2018 रोज मंगळवार ला दुपारी 2 वाजता
मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय आणि राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्म. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आणि निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. सरकारच्या कर्मचारी हितविरोधी धोरणाविरुद्ध आपल्या अस्तित्वाची लढाई हि आपली सामाजिक आणि नैतिक आद्य जबाबदारी आहे.
१)अंशदायी पेन्शन योजना रद्द करा. आणि जुनीच पेन्शन योजना सुरू करा.
२) OUTSOURCING खाजगीकरण, कंत्राटीकरण,बंद करा व कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा. प्रत्येक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26000/- रुपये करा आणि रिक्त पदे भरून बेरोजगारी कमी करा. वाढती महागाई कमी करा. 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून त्वरित लागू करा. वेतन त्रुटी निवारण झालीच पाहिजे, थकीत महागाई भत्त्याची रक्कम त्वरित द्या. महिलांसाठी दोन वर्षाची बाल संगोपन रजा, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करा. दि 27 मार्च 2018 रोजी देशभरातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन करून मा. प्रधानमंत्री यांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करतील.
तेंव्हा सर्व कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनीसह मंगळवार दि. 27 मार्च 2018 रोजी दु. 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे मोठ्या संख्येनी उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे।
आपलाच
रमेश पिंपळशेंडे
सरचिटणीस,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,चंद्रपूर
No comments:
Post a Comment