DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Thursday, February 28, 2019

📢
 *।।महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना।।*
   *साखळी उपोषण*
◆●• *ठळक बाबी*•●◆
◆ 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे राज्यकार्यकारणी, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व संघटन शिलेदारांचे उपोषण सुरू होते.
◆ *सलग 3 तीन दिवस हे साखळी उपोषण चालू होते.*
◆ *आज दुपारी 28 फेब्रुवारी रोजी मा. वित्तमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली.*
◆ *त्यांनी अंशदायी पेन्शन योजना बाबत समिती नेमली असून सविस्तर चर्चेसाठी समिती अध्यक्ष वित्त राज्यमंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेण्यास प्राथमिक अवस्थेत सांगितले.*
◆ *त्यानंतर संघटन शिष्टमंडळाला प्रशासनाद्वारे मा.वित्तराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पाचारण केले.*
◆ *केसरकर साहेबांशी सविस्तर 20-25 मिनिटे कुटुंब निवृत्ती वेतन आणि जुनी पेंशन योजना लागू करण्या बाबत चर्चा झाली.*
◆ *अनेक मुद्यांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष वित्त विभागाचे सचिव साहेबांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या सर्व चर्चेत आपण हे स्पष्ट करण्यात यशस्वी झालो आहोत की, या नवीन अंशदायी पेन्शन योजनेतील अंमलबजावणी, योजनेने होणारी फसवणूक, मयत कर्मचारी कुटुंबांना आजपर्यंत न मिळालेला कोणताही लाभ व इतर सर्वच विषयावर प्रत्यक्ष वस्तुस्थिती व मंत्रालय पातळीवरील समज हे खूपच वेगवेगळे आहेत हे आपण मंत्रीमहोदयांच्या समोर उघड केले आहे.*
◆ *मयत कर्मचारी कुटुंबाला 10 लाखाच्या आदेशाने कोणताही लाभ मिळालेला नाही, नव्हे त्यातील अटी ह्या अन्यायकारक असून त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे योग्य असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.*
◆ *या सर्व बाबींमुळे व आपले सर्व म्हणणे आकडेवारीसह, कागदपत्रांद्वारे प्रत्यक्ष मांडून समोरा समोर चर्चा करण्यासाठी आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळातील 5 सदस्यांना शासनाने नेमलेल्या समिती चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचे स्पष्ट आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले असून तात्काळ 5 ही नावे प्रत्यक्ष लिहून घेतले आहेत हे आपले खूप मोठे यश आहे.*
◆ *एकंदरीत या उपोषण आंदोलनाचे फलित म्हणजे, DCPS/NPS योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती, प्रशासन व संघटना यांचे याविषयीचे असलेले मत मंत्रीमहोदयांच्या समोर आपण उघडे केले आहे. तसेच शासनाने नेमलेल्या समितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. आपण आपल्या मागण्यांबाबत आज "एक मैलाचा दगड" पार केलेला आहे.*
◆ या सर्व घडामोडी मुळे उपस्थित संघटन पदाधिकारी यांचे समाधान झाले असल्याने *आपले साखळी उपोषण आपण आज रात्रीपासून मागे घेतले आहे.*

कायम आपलाच
~शिवाजी खुडे
राज्यप्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना
■◆●•●◆■◆●•◆■

Tuesday, February 19, 2019

महाराज घात झाला , घात झाला महाराज.  
     आपले ४४ मावळे त्या गनिमांनी घात करून मारले महाराज. गाफील असताना अचानक हल्ला केला त्या भडव्यांनी , काय होतंय आणि काय नाही हे कळायच्या आतच फडशा पाडला त्यांनी आपल्या मावळ्यांचा. लपून छापून हल्ला केला बाजारबुणग्यांनी सवयीप्रमाणं मागूनच वार केला, समोर यायची लायकी नाय कुत्र्यांची. महाराज ह्या कुत्र्यांचं कायतरी केलं पाहिजे, कायमचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यांचा. रयत घाबरलीये महाराज, सैरबैर झालीये महाराज , कस आणि काय होऊन बसलं हे. आपला एक मावळा म्हणजे एक लाखाला भारी , *ह्याच मावळ्यांच्या जीवावरच आपली रयत आणि आपला देश सुरक्षित आहे महाराज.* पण महाराज मावळ्यांनी तरी किती हल्ले झेलायचे ह्या भडव्यांचे ? ह्यांना घरात घुसून शाहिस्तेखान दाखवलाच पाहिजे महाराज आणि आता फक्त बोट नाहीतर पूर्ण शीरच धडापासून वेगळं केलं पाहिजे महाराज. थांबलं पाहिजे महाराज हे सगळं थांबलं पाहिजे. युद्धप्रसंगी ठीक आहे  पण इतरवेळी सुद्धा आपल्या मावळ्यांनी जीव मुठीत धरून जगायचं..? आपल्याच मुलुखात आपल्यावरच होणारे हल्ले तरी किती दिवस पाहायचे महाराज ? 
            अजून एक सांगायचंय महाराज.... म्हणजे सांगायला लाज वाटतीये, हि सांगायची वेळ आमच्यावर येतीये हेच आमचं दुर्दैव. पण महाराज आपल्या काही लोकांना ह्याच काय सोयरा सुतक नाहीये महाराज.  *आपले स्वार्थी नेते जे तुमचं नाव लावून मोठे झाले ते ह्या जवानांच्या मृत्यूवर आपल्या राजकारणाची पोळी भाजताते महाराज. एकमेकांवर टीकेची बोट दाखवताते महाराज.*     *आणि आणि मृत सैनिकांचे रक्त थंड होयच्या आतच ह्या नेत्यांचे मूर्ख चमचे ज्यांना आपला देश तर सोडा पण आईबापा पेक्षा आपला नेता आणि पक्ष मोठा वाटतो अशी लोक आपल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रचाराला लागली सुद्धा. आपले मंत्री पक्षाच्या गणितात अडकलेत.* आणि मोठ्या मोठ्यांनी तर फक्त सोशल मीडिया वरूनच आपला राग व्यक्त केला. जर सैनिक देखील फक्त सोशल मीडियावर तैनात राहिले तर ? काय होईल ह्या देशाचं ? करेल का कोण विचार ?  *खरंतर महाराज पहिलं ह्या दीडदमडीच्या लोकांचा कडेलोट करायला हवा. आधी घरातील शत्रू मारायला हवा.* पण महाराज हे सगळं करणार कोण ? कारण शिवाजी या नावाचा उपयोग फक्त आम्ही सत्तेसाठी करतो. पण शिवाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाहीत महाराज, तुमच्यासारखा कर्तव्यदक्ष, न्यायदक्ष, प्रजादक्ष, व आपल्या सैनिकांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम करणारा राजा आम्हाला पुन्हा मिळेल का..? 
            महाराज क्षमा असावी पण एक विचारतो , " राजे पुन्हाएकदा जन्म घेता का आमच्यासाठी ?'🙏🙏
संतोष वाटगुरे, 
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, चंद्रपुर

Tuesday, February 12, 2019

*मंत्रालयीन पाठपुरावा व एल्गार मार्च बाबत...!*
_______________________________

*!...महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन...!*

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻

आपला पेन्शन एल्गार मार्च आता तोंडावर आला आहे.. आपण सर्वच जण अगदी मोठ्या रेकॉर्डब्रेक संख्येने मुंबईत दाखल होणार आहात.. या वेळी पेन्शन मार्च होणार म्हणजे होणारच..!

चला तर लागा मग तयारीला..!
आपणही येऊ नि सोबत ५ जण घेऊन येऊ..!

२० फेब्रुवारी ला मुंबईत फक्त आपलाच आवाज हवा..! फक्त आपलाच आवाज..!
_______________________________

*अ) मंत्रालयीन भेटी :-*

*१. मुख्यमंत्री यांना पत्र :-*
आपण २० फेब्रुवारी पासून करत असलेल्या एल्गार मार्च व आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले..

*२. Dcps/NPS अभ्यासगटाच्या बैठकांबाबत महत्त्वाचे सदस्य राज्यमंत्री मदन येरावर यांची भेट*

• शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णयाद्वारे DCPS/NPS त्रुटी काढण्यासंबंधी तीन महिन्यांकरिता एक समिती स्थापन केली होती. त्यातील सदस्य राज्यमंत्री मदन येरावर साहेब यांची भेट घेतली.. व प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्याकडे एक draft देखील सुपूर्द केला आहे.
• अजून एकही बैठक या समितीची झाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून होणाऱ्या बैठकीत आपला एक/दोन प्रतिनिधी यांना बोलावू हे त्यांनी सांगितले.
_अधिवेशन काळात ही बैठक होणार आहे.._

या पूर्ण बैठकीसाठी *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांचे तत्पर प्रयत्न कामी आले.!
धन्यवाद..!

*३. २३/१० बाबत भेट :-*

• 'आपल्या सर्वांच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे २३/१० चा वेतनश्रेणीचा शासन निर्णय' या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पुन्हा भेट घेतली. (जवळपास १७-१८ वी भेट) 
• लवकरच म्हणजे येत्या आठवड्याभरात १००% त्याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या भेटीसाठी देखील *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांनी सहकार्य केले. ते देखील सोबत उपस्थित होते. 
______________________________
*विशेष उल्लेख*

*आमदार केळकर साहेब* यांच्या भेटीसंदर्भात जालना *जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर* यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच *राज्याध्यक्ष वितेश खांडेकर* व *राज्य महासचिव गोविंद उगले* यांनी समन्वय साधत प्रयत्न केले. यावेळी *कोकणविभाग प्रमुख अमोल माने* आणि *मी (प्राजक्त)* सोबत होतो. 
______________________________

*ब) पेन्शन एल्गार मार्च बाबत*

*१. आभार/अभिनंदन:-*

आपल्या पेन्शन एल्गार मार्च ला परवानगी मिळावी म्हणून ज्या आमदार महोदयांनी आपली शिफारस पत्रे दिलीत, त्या सर्वांचे आभार.. अशीच साथ संपूर्ण प्रक्रियेत असेल अशी खात्री आहे..

*धन्यवाद...!*
•आमदार विक्रमजी काळे
•आमदार कपिलजी पाटील
•आमदार राणा जगजितसिंह पाटील
•आमदार बाळारामजी पाटील
•आमदार दत्तात्रयजी सावंत
•आमदार किशोरजी दराडे

सहकाऱ्यांनो,
• प्रदीप सोनटक्के सर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड ते सत्याग्रह भूमी 'चिरनेर' असा 'रन फॉर पेन्शन' चा पल्ला पार करणार आहेत..

• *आपला पेन्शन मार्च जिजामाता उद्यान,भायखळा(पूर्व) ते आझाद मैदान असा होणार म्हणजे होणारच आणि नंतर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत..*
______________________________

चला तर मग अजिबात किंतु-परंतु यांचा विचार न करता उर्जावान व्हा.. आपल्या सहकाऱ्यांना करा..!

*यावेळी तर यावंच लागतंय..!*
______________________________
*कायम आपलाच*
*प्राजक्त झावरे-पाटील*
८८९८८८०२२२ / ९८३३७८१८१७
*!.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ..!*

Monday, February 11, 2019

📢

*२० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैलीत संदर्भात*..

*पहिला टप्पा*
मित्रहो २० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैली ची सुरुवात  १७ फेब्रुवारी पासुचन होईल किल्ले रायगड पासुन पेंशन चे राष्ट्रीय आयकाॅन प्रदिप सोनटक्के हे किल्ले रायगड ते चिरनेर असा प्रवास धावत सुरु करतील व १९ फेब्रुवारी ला त्यांचे  स्वागत आमदार महोदय सर्व राज्य कार्यकारिणी यांच्या उपस्थित केले जाईल.

*दुसरा टप्पा*
२० फेब्रुवारी ला आपण खुप मोठ्या संख्येने एकत्रीत होऊन जिजामाता उद्यान (भायखळा पुर्व) ते आजाद मैदान अशी पेंशन एल्गार रॅली निघेल.

*तिसरा टप्पा*
आजाद मैदान ला पोहचल्यावर आपल्या मागण्यांसाठी सरकार किती सकारात्मक आहे हे लक्षात घेऊन तिथेच आमरण उपोषण (२० तारखे) पासुनच आमरण उपोषण सुरू केले जाईल.

अशा तीन टप्प्यात आंदोलन होणार असुन आपल्या ला वाटत असेल की मागील वेळेस ही राज्य कार्यकारिणी कडुन असेच आव्हान करण्यात आले होते परंतु तस काही झाल नव्हत पण यावेळेस आपण पुर्ण तयारी करुनच रस्त्यावर उतरत आहोत म्हणुन किंतू परंतु मनात न आणता मोठया संख्येने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने ने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपल आंदोलन आपण निकराने लढु.

टिप :- १)पिण्याचे पाणी व टाॅईलेट यापेक्षा जास्त व्यवस्था आपल्या कडुन केली जाऊ शकणार नाही.
२)आंदोलन ला येताना ३-४ दिवस रितसर सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
३)कृपया आंदोलना ला येताना केवळ आंदोलना तच यावे मुंबई दर्शन साठी येऊ नये.

राज्याध्यक्ष /राज्य सचिव
विश्वस्त तथा राज्य कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.