DCPS कर्मचाऱ्यांची माहिती

Monday, August 5, 2019

*चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा*

          हा नारा  स्वातंत्रप्राप्तीसाठी भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे.आणि हा नारा जोपासत अहिंसक मार्गाने मागील 3 वर्षांपासून जुन्या पेंशनसाठी झटत आहोत.आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत चळवळ अखंड करीत राहून यश मिळविणारच ...

  ह्या मागणी करतांना जाणीवपूर्वक शासन डोळेझाक करीत आहे.एक ना एक दिवस सोन्याचा दिन उगवेलच म्हणून अन्याय सहन करून घरात बसायचे की संपात उतरायचे???

तुम्हीच ठरवा...

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना समवेत राज्यातील सर्व खाते व संवर्ग निहाय कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

मुख्य मागणी

*1 नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे ह्या मुख्य मागणीसह इतर मागण्या..*

एकीकडे शासन सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला वयोवृद्ध (80,85,90,95,100) ह्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त पेंशन देण्यासाठी शासन निर्णय काढतो.

मग

नोव्हे 2005 नंतर सेवेत आलेल्या व सेवेत आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याला वाऱ्यावर का?????सोडले???

त्याच्या पोरांचे शिक्षण कोण करणार???

नोव्हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यानेच कोणतं पाप केलंय हा जॉब विचारण्यासाठी शतप्रतिषद कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन आपला आक्रोश दाखवावा..आपला आक्रोश म्हणजेच सरकारला जाग

चला..उठा..सज्ज व्हा
20 ऑगस्ट चा सर्व कर्मचाऱ्याचा संप
शासनाला फुटायला हवा कंप

*शासन कलम 370 रद्द करू शकते मग dcps/nps ही अन्यायकारक योजना रद्द करू शकत नाही का ???नाही का??*

म्हणूनच जागे व्हा,जागे करा व संपात सहभागी व्हा


*मी जर तरुण असतो तर केव्हाच बंड करून उठलो असतो* 

अशी म्हणायची वेळ येऊ न देता आताच बंड करू या..

*एक ही बात, काम की बात,युवा आपके साथ*

*एकच मिशन,जुनी पेंशन*
*नो राजकारण,ओन्ली ऍक्शन*

आपलाच
श्री दुशांत निमकर जिल्हाध्यक्ष
चंद्रपुर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

Saturday, June 29, 2019

📢
  
              *!..महत्त्वाचे..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

प्रति,
      सर्व जिल्हापदाधिकारी
      सर्व तालुकाध्यक्ष
     चंद्रपूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटन

*संदर्भ- दिनांक 28 जून 2019 चे राज्यकार्यकारिणीचे पत्र.*

            आपणांस सूचित करण्यात येते की, *राज्यकर्मचारी ,सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने* अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी, व इतर मागण्याकडे लक्षवेध करण्यासाठी *दिनांक ३ जुलै २०१९ रोजी सर्व कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन करून,घोषणा देत 'लक्षवेधी दिन पाळण्याचे ठरविले आहे.*
       
            आपली संघटना अविरतपणे नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासाठी आंदोलने करीत आहे. होणाऱ्या *'लक्षवेधी दिन'* आंदोलनात अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना सुरु करावी ही मागणी प्रामुख्याने असल्याने उपरोक्त आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन समन्वय समितीचा भाग असल्याने सक्रिय सहभागी होत आहे.
  
तरीपण *सर्व जिल्हाकार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी व सर्व शिलेदार  दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत घोषणा*  देत उपरोक्त  आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे. यानंतर ही शासनाने आपल्या मागण्याबाबत असेच उदासीन धोरण ठेवले तर *समन्वय समितीच्या वतीने मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप* जाहीर करण्यात येणार आहे. 

       *सोबतच लक्षवेधी दिनाचे फोटोज व विडिओज ला पोस्ट करून सोसिअल मिडियाच्या  माध्यमातून प्रसिद्धी द्यावी.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              आपलेच
    जिल्हाध्यक्ष/जिल्हासचिव 
      व समस्त कार्यकारिणी
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन*
            जिल्हा चंद्रपूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Monday, April 22, 2019

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*न्यायालयीन वार्ता थेट सर्वोच्च न्यायालयातून....* 
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*🎓👉नवी दिल्ली,- 31 ऑक्टोबर 2005 चा जीआर रद्द करून 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. पिटिशन क्रमांक 1273/2014 जी देवेंद्र अंबेटकर वर्सेस  द स्टेट ऑफ महाराष्ट्र गव्हरमेंट ही याचिका उच्च न्यायालय औरंगाबादने डिसमिस केली होती. त्याला मा.सर्वोच्च न्यायालयात सहा आठवड्याच्या आत आव्हान देण्यास वेळ दिला होता. विहित मुदतीत मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्यावर आज दिनांक 22/ 4 /2018 रोजी सुनावणी घेण्यात आली .*

*🎓👉सर्वात महत्त्वाचे आजची सुनावणी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.न्या.आर.नरीमन व एस.कौल यांच्यासमोर झाली.मा.सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की या निकालावर आर्ग्युमेंट होणे आवश्यक असून बरेचसे मुद्दे विचारात घेतले गेलेले नाही.या मॅटर मध्ये तथ्य असून हे मॅटर चालवले जावे.... त्यामुळे हे मॅटर चालवण्यासाठी व विषय ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे..... लिव्ह ग्रँट केलेली आहे.... मॅटर ऍडमिट केले आहे....लवकरात लवकर तारीख घेऊन मॅटर पूर्ण ऐकले जाणार आहे ......या मॅटर मध्ये सचिव, महाराष्ट्र सरकार , सचिव,वित्त, महाराष्ट्र सरकार,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रतिवादी करण्यातआलेले आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा होता मॅटर ऐकले जाऊन चालवण्यास परवानगी मिळणे. ती मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेलीआहे त्यामुळे जुनी पेन्शन मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत..... पूर्ण ताकतीने पुराव्यानिशी हे मॅटर चालवले जाणार आहे. तरी सर्व Dcps धारकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका असल्यास संबंधित व्यक्तीशी संपर्क करून योग्य ती माहिती घ्यावी. यश आपलेच आहे ...ते मिळणारच आहे.... फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि ती आपण करणार आहोत.... आपणाकडून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.....आपण जिंकणारच आहोत यावर विश्वास ठेवावा....*

*🎓👉आज याचिकाकर्त्यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.प्रशांत कातनेश्वरकर साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेऊन  बाजू मांडली ...त्यांना सहकार्य अॅड सूर्यवंशी साहेब , जेष्ठ विधिज्ञ अॅड.अरविंद  अंबेटकर साहेब , अॅड. केतन पोटे साहेब यांनी  मा.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे उपस्थित राहून कायदेशीर सहकार्य केले......*

Thursday, February 28, 2019

📢
 *।।महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना।।*
   *साखळी उपोषण*
◆●• *ठळक बाबी*•●◆
◆ 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे राज्यकार्यकारणी, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी व संघटन शिलेदारांचे उपोषण सुरू होते.
◆ *सलग 3 तीन दिवस हे साखळी उपोषण चालू होते.*
◆ *आज दुपारी 28 फेब्रुवारी रोजी मा. वित्तमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली.*
◆ *त्यांनी अंशदायी पेन्शन योजना बाबत समिती नेमली असून सविस्तर चर्चेसाठी समिती अध्यक्ष वित्त राज्यमंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेण्यास प्राथमिक अवस्थेत सांगितले.*
◆ *त्यानंतर संघटन शिष्टमंडळाला प्रशासनाद्वारे मा.वित्तराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पाचारण केले.*
◆ *केसरकर साहेबांशी सविस्तर 20-25 मिनिटे कुटुंब निवृत्ती वेतन आणि जुनी पेंशन योजना लागू करण्या बाबत चर्चा झाली.*
◆ *अनेक मुद्यांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष वित्त विभागाचे सचिव साहेबांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. या सर्व चर्चेत आपण हे स्पष्ट करण्यात यशस्वी झालो आहोत की, या नवीन अंशदायी पेन्शन योजनेतील अंमलबजावणी, योजनेने होणारी फसवणूक, मयत कर्मचारी कुटुंबांना आजपर्यंत न मिळालेला कोणताही लाभ व इतर सर्वच विषयावर प्रत्यक्ष वस्तुस्थिती व मंत्रालय पातळीवरील समज हे खूपच वेगवेगळे आहेत हे आपण मंत्रीमहोदयांच्या समोर उघड केले आहे.*
◆ *मयत कर्मचारी कुटुंबाला 10 लाखाच्या आदेशाने कोणताही लाभ मिळालेला नाही, नव्हे त्यातील अटी ह्या अन्यायकारक असून त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे योग्य असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उदाहरण देऊन स्पष्ट केले.*
◆ *या सर्व बाबींमुळे व आपले सर्व म्हणणे आकडेवारीसह, कागदपत्रांद्वारे प्रत्यक्ष मांडून समोरा समोर चर्चा करण्यासाठी आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळातील 5 सदस्यांना शासनाने नेमलेल्या समिती चर्चेत प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचे स्पष्ट आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले असून तात्काळ 5 ही नावे प्रत्यक्ष लिहून घेतले आहेत हे आपले खूप मोठे यश आहे.*
◆ *एकंदरीत या उपोषण आंदोलनाचे फलित म्हणजे, DCPS/NPS योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती, प्रशासन व संघटना यांचे याविषयीचे असलेले मत मंत्रीमहोदयांच्या समोर आपण उघडे केले आहे. तसेच शासनाने नेमलेल्या समितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. आपण आपल्या मागण्यांबाबत आज "एक मैलाचा दगड" पार केलेला आहे.*
◆ या सर्व घडामोडी मुळे उपस्थित संघटन पदाधिकारी यांचे समाधान झाले असल्याने *आपले साखळी उपोषण आपण आज रात्रीपासून मागे घेतले आहे.*

कायम आपलाच
~शिवाजी खुडे
राज्यप्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना
■◆●•●◆■◆●•◆■

Tuesday, February 19, 2019

महाराज घात झाला , घात झाला महाराज.  
     आपले ४४ मावळे त्या गनिमांनी घात करून मारले महाराज. गाफील असताना अचानक हल्ला केला त्या भडव्यांनी , काय होतंय आणि काय नाही हे कळायच्या आतच फडशा पाडला त्यांनी आपल्या मावळ्यांचा. लपून छापून हल्ला केला बाजारबुणग्यांनी सवयीप्रमाणं मागूनच वार केला, समोर यायची लायकी नाय कुत्र्यांची. महाराज ह्या कुत्र्यांचं कायतरी केलं पाहिजे, कायमचा बंदोबस्त केला पाहिजे ह्यांचा. रयत घाबरलीये महाराज, सैरबैर झालीये महाराज , कस आणि काय होऊन बसलं हे. आपला एक मावळा म्हणजे एक लाखाला भारी , *ह्याच मावळ्यांच्या जीवावरच आपली रयत आणि आपला देश सुरक्षित आहे महाराज.* पण महाराज मावळ्यांनी तरी किती हल्ले झेलायचे ह्या भडव्यांचे ? ह्यांना घरात घुसून शाहिस्तेखान दाखवलाच पाहिजे महाराज आणि आता फक्त बोट नाहीतर पूर्ण शीरच धडापासून वेगळं केलं पाहिजे महाराज. थांबलं पाहिजे महाराज हे सगळं थांबलं पाहिजे. युद्धप्रसंगी ठीक आहे  पण इतरवेळी सुद्धा आपल्या मावळ्यांनी जीव मुठीत धरून जगायचं..? आपल्याच मुलुखात आपल्यावरच होणारे हल्ले तरी किती दिवस पाहायचे महाराज ? 
            अजून एक सांगायचंय महाराज.... म्हणजे सांगायला लाज वाटतीये, हि सांगायची वेळ आमच्यावर येतीये हेच आमचं दुर्दैव. पण महाराज आपल्या काही लोकांना ह्याच काय सोयरा सुतक नाहीये महाराज.  *आपले स्वार्थी नेते जे तुमचं नाव लावून मोठे झाले ते ह्या जवानांच्या मृत्यूवर आपल्या राजकारणाची पोळी भाजताते महाराज. एकमेकांवर टीकेची बोट दाखवताते महाराज.*     *आणि आणि मृत सैनिकांचे रक्त थंड होयच्या आतच ह्या नेत्यांचे मूर्ख चमचे ज्यांना आपला देश तर सोडा पण आईबापा पेक्षा आपला नेता आणि पक्ष मोठा वाटतो अशी लोक आपल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रचाराला लागली सुद्धा. आपले मंत्री पक्षाच्या गणितात अडकलेत.* आणि मोठ्या मोठ्यांनी तर फक्त सोशल मीडिया वरूनच आपला राग व्यक्त केला. जर सैनिक देखील फक्त सोशल मीडियावर तैनात राहिले तर ? काय होईल ह्या देशाचं ? करेल का कोण विचार ?  *खरंतर महाराज पहिलं ह्या दीडदमडीच्या लोकांचा कडेलोट करायला हवा. आधी घरातील शत्रू मारायला हवा.* पण महाराज हे सगळं करणार कोण ? कारण शिवाजी या नावाचा उपयोग फक्त आम्ही सत्तेसाठी करतो. पण शिवाजी महाराज आम्हाला कधी कळालेच नाहीत महाराज, तुमच्यासारखा कर्तव्यदक्ष, न्यायदक्ष, प्रजादक्ष, व आपल्या सैनिकांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम करणारा राजा आम्हाला पुन्हा मिळेल का..? 
            महाराज क्षमा असावी पण एक विचारतो , " राजे पुन्हाएकदा जन्म घेता का आमच्यासाठी ?'🙏🙏
संतोष वाटगुरे, 
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, चंद्रपुर

Tuesday, February 12, 2019

*मंत्रालयीन पाठपुरावा व एल्गार मार्च बाबत...!*
_______________________________

*!...महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन...!*

सहकाऱ्यांनो नमस्कार...🙏🏻

आपला पेन्शन एल्गार मार्च आता तोंडावर आला आहे.. आपण सर्वच जण अगदी मोठ्या रेकॉर्डब्रेक संख्येने मुंबईत दाखल होणार आहात.. या वेळी पेन्शन मार्च होणार म्हणजे होणारच..!

चला तर लागा मग तयारीला..!
आपणही येऊ नि सोबत ५ जण घेऊन येऊ..!

२० फेब्रुवारी ला मुंबईत फक्त आपलाच आवाज हवा..! फक्त आपलाच आवाज..!
_______________________________

*अ) मंत्रालयीन भेटी :-*

*१. मुख्यमंत्री यांना पत्र :-*
आपण २० फेब्रुवारी पासून करत असलेल्या एल्गार मार्च व आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले..

*२. Dcps/NPS अभ्यासगटाच्या बैठकांबाबत महत्त्वाचे सदस्य राज्यमंत्री मदन येरावर यांची भेट*

• शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी शासन निर्णयाद्वारे DCPS/NPS त्रुटी काढण्यासंबंधी तीन महिन्यांकरिता एक समिती स्थापन केली होती. त्यातील सदस्य राज्यमंत्री मदन येरावर साहेब यांची भेट घेतली.. व प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्याकडे एक draft देखील सुपूर्द केला आहे.
• अजून एकही बैठक या समितीची झाली नसल्याचे त्यांनी सांगितले असून होणाऱ्या बैठकीत आपला एक/दोन प्रतिनिधी यांना बोलावू हे त्यांनी सांगितले.
_अधिवेशन काळात ही बैठक होणार आहे.._

या पूर्ण बैठकीसाठी *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांचे तत्पर प्रयत्न कामी आले.!
धन्यवाद..!

*३. २३/१० बाबत भेट :-*

• 'आपल्या सर्वांच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे २३/१० चा वेतनश्रेणीचा शासन निर्णय' या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पुन्हा भेट घेतली. (जवळपास १७-१८ वी भेट) 
• लवकरच म्हणजे येत्या आठवड्याभरात १००% त्याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या भेटीसाठी देखील *आमदार संजय केळकर साहेब* व *शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे सर* यांनी सहकार्य केले. ते देखील सोबत उपस्थित होते. 
______________________________
*विशेष उल्लेख*

*आमदार केळकर साहेब* यांच्या भेटीसंदर्भात जालना *जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर* यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच *राज्याध्यक्ष वितेश खांडेकर* व *राज्य महासचिव गोविंद उगले* यांनी समन्वय साधत प्रयत्न केले. यावेळी *कोकणविभाग प्रमुख अमोल माने* आणि *मी (प्राजक्त)* सोबत होतो. 
______________________________

*ब) पेन्शन एल्गार मार्च बाबत*

*१. आभार/अभिनंदन:-*

आपल्या पेन्शन एल्गार मार्च ला परवानगी मिळावी म्हणून ज्या आमदार महोदयांनी आपली शिफारस पत्रे दिलीत, त्या सर्वांचे आभार.. अशीच साथ संपूर्ण प्रक्रियेत असेल अशी खात्री आहे..

*धन्यवाद...!*
•आमदार विक्रमजी काळे
•आमदार कपिलजी पाटील
•आमदार राणा जगजितसिंह पाटील
•आमदार बाळारामजी पाटील
•आमदार दत्तात्रयजी सावंत
•आमदार किशोरजी दराडे

सहकाऱ्यांनो,
• प्रदीप सोनटक्के सर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड ते सत्याग्रह भूमी 'चिरनेर' असा 'रन फॉर पेन्शन' चा पल्ला पार करणार आहेत..

• *आपला पेन्शन मार्च जिजामाता उद्यान,भायखळा(पूर्व) ते आझाद मैदान असा होणार म्हणजे होणारच आणि नंतर आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत..*
______________________________

चला तर मग अजिबात किंतु-परंतु यांचा विचार न करता उर्जावान व्हा.. आपल्या सहकाऱ्यांना करा..!

*यावेळी तर यावंच लागतंय..!*
______________________________
*कायम आपलाच*
*प्राजक्त झावरे-पाटील*
८८९८८८०२२२ / ९८३३७८१८१७
*!.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ..!*

Monday, February 11, 2019

📢

*२० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैलीत संदर्भात*..

*पहिला टप्पा*
मित्रहो २० फेब्रुवारी ला होणाऱ्या पेंशन एल्गार महारैली ची सुरुवात  १७ फेब्रुवारी पासुचन होईल किल्ले रायगड पासुन पेंशन चे राष्ट्रीय आयकाॅन प्रदिप सोनटक्के हे किल्ले रायगड ते चिरनेर असा प्रवास धावत सुरु करतील व १९ फेब्रुवारी ला त्यांचे  स्वागत आमदार महोदय सर्व राज्य कार्यकारिणी यांच्या उपस्थित केले जाईल.

*दुसरा टप्पा*
२० फेब्रुवारी ला आपण खुप मोठ्या संख्येने एकत्रीत होऊन जिजामाता उद्यान (भायखळा पुर्व) ते आजाद मैदान अशी पेंशन एल्गार रॅली निघेल.

*तिसरा टप्पा*
आजाद मैदान ला पोहचल्यावर आपल्या मागण्यांसाठी सरकार किती सकारात्मक आहे हे लक्षात घेऊन तिथेच आमरण उपोषण (२० तारखे) पासुनच आमरण उपोषण सुरू केले जाईल.

अशा तीन टप्प्यात आंदोलन होणार असुन आपल्या ला वाटत असेल की मागील वेळेस ही राज्य कार्यकारिणी कडुन असेच आव्हान करण्यात आले होते परंतु तस काही झाल नव्हत पण यावेळेस आपण पुर्ण तयारी करुनच रस्त्यावर उतरत आहोत म्हणुन किंतू परंतु मनात न आणता मोठया संख्येने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने ने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन आपल आंदोलन आपण निकराने लढु.

टिप :- १)पिण्याचे पाणी व टाॅईलेट यापेक्षा जास्त व्यवस्था आपल्या कडुन केली जाऊ शकणार नाही.
२)आंदोलन ला येताना ३-४ दिवस रितसर सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
३)कृपया आंदोलना ला येताना केवळ आंदोलना तच यावे मुंबई दर्शन साठी येऊ नये.

राज्याध्यक्ष /राज्य सचिव
विश्वस्त तथा राज्य कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.